शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्यातील दूध दर अभ्यासासाठी समिती नियुक्त शासनाचा निर्णय : दहा दिवसांत देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:22 IST

कोल्हापूर : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध दराबाबत येणाºया अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली.

ठळक मुद्देम्हैस दुधाप्रमाणे गाय दुधाला ग्राहकांकडून मागणी नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या पावडरीचा दर कोसळल्याने गाय दूध खुल्या बाजारात विक्रीसाठी आणणे हाच एकमेव पर्याय

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध दराबाबत येणाºया अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. या समितीने येत्या दहा दिवसांत अहवाल द्यावा, असे समितीला सुचविण्यात आले आहे. दराचा अभ्यास करताना एकूण दूध संघांच्या अडीअडचणींचाही विचार करावा, असेही शासनाने म्हटले आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे कालहरण करण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया दूध व्यवसायातून उमटली आहे.

राज्यात सध्या गायीच्या दूध दराचा विषय चांगलाच तापला आहे. राज्य शासनाने १८ जूनला सहकारी व खासगी दूध संघांनी गाय दुधाच्या खरेदी दरात लिटरला ३ रुपये वाढ करावी, असे आदेश दिले. सध्या गाय दुधाचा प्रतिलिटर खरेदी दर २५ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या पावडरीचा दर कोसळल्याने गाय दूध खुल्या बाजारात विक्रीसाठी आणणे हाच एकमेव पर्याय आहे; परंतु म्हैस दुधाप्रमाणे गाय दुधाला ग्राहकांकडून मागणी नाही. त्यामुळे दूध संघापुढे या दुधाचे काय करायचे असा पेच निर्माण झाला आहे. संघांनी १ नोव्हेंबरपासून दर वाढवून द्यायचे राहिले बाजूलाच परंतु आहे त्या दरात २ ते ५ रुपयांपर्यंत कपात केली. त्यावरून उत्पादकांत असंतोष उफाळला. दर दिला नाही तर दूध संघावर कारवाई करण्याच्या सरकारने नोटिसाही काढल्या. त्या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबरला दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध संघांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत दूध दराचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.समिती अशीपशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय विभागाचे सचिव विकास देशमुख हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत दुग्धविकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव व ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे हे सदस्य आहेत. दुग्ध विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव असतीलदृष्टीक्षेपात गाय दूध उद्योगपश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत दोन-तीन जिल्हे वगळता सर्वत्र गाय दुधाचे उत्पादन. सध्या राज्यात प्रतिदिन २ कोटी ८० लाख लिटर उत्पादन.त्यातील १ कोटी १२ लाख लिटर बाजारात विक्रीसाठी. त्यातील ६० लाख लिटर खासगी दूध संघामार्फत, उर्वरित ४० लाख लिटर सहकारी दूध संघामार्फत, गवळी व्यावयायिकामार्फत १२ लाखांचे वितरण 

राज्य शासनाने समितीत सगळेच सरकारी अधिकारी नियुक्त केल्यामुळे शासनाला हवा तसाच ते अहवाल देणार आहेत. या समितीत दूध कृती समितीचे अध्यक्ष, सहकारी व खासगी दूध संघांचे प्रतिनिधींनीही स्थान हवे होते. दर वाढवून द्या म्हणणे म्हणजे चांगला चाललेला दूध धंदा मोडण्याचाच प्रकार आहे. विरोधकांनीही या प्रश्नांत राजकारण आणू नये.- अरुण नरके, अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन