शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यातील दूध दर अभ्यासासाठी समिती नियुक्त शासनाचा निर्णय : दहा दिवसांत देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:22 IST

कोल्हापूर : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध दराबाबत येणाºया अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली.

ठळक मुद्देम्हैस दुधाप्रमाणे गाय दुधाला ग्राहकांकडून मागणी नाही.आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या पावडरीचा दर कोसळल्याने गाय दूध खुल्या बाजारात विक्रीसाठी आणणे हाच एकमेव पर्याय

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यातील सहकारी दूध संघांना दूध दराबाबत येणाºया अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी चार सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली. या समितीने येत्या दहा दिवसांत अहवाल द्यावा, असे समितीला सुचविण्यात आले आहे. दराचा अभ्यास करताना एकूण दूध संघांच्या अडीअडचणींचाही विचार करावा, असेही शासनाने म्हटले आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे कालहरण करण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया दूध व्यवसायातून उमटली आहे.

राज्यात सध्या गायीच्या दूध दराचा विषय चांगलाच तापला आहे. राज्य शासनाने १८ जूनला सहकारी व खासगी दूध संघांनी गाय दुधाच्या खरेदी दरात लिटरला ३ रुपये वाढ करावी, असे आदेश दिले. सध्या गाय दुधाचा प्रतिलिटर खरेदी दर २५ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या पावडरीचा दर कोसळल्याने गाय दूध खुल्या बाजारात विक्रीसाठी आणणे हाच एकमेव पर्याय आहे; परंतु म्हैस दुधाप्रमाणे गाय दुधाला ग्राहकांकडून मागणी नाही. त्यामुळे दूध संघापुढे या दुधाचे काय करायचे असा पेच निर्माण झाला आहे. संघांनी १ नोव्हेंबरपासून दर वाढवून द्यायचे राहिले बाजूलाच परंतु आहे त्या दरात २ ते ५ रुपयांपर्यंत कपात केली. त्यावरून उत्पादकांत असंतोष उफाळला. दर दिला नाही तर दूध संघावर कारवाई करण्याच्या सरकारने नोटिसाही काढल्या. त्या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबरला दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दूध संघांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्या बैठकीत दूध दराचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.समिती अशीपशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय विभागाचे सचिव विकास देशमुख हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत दुग्धविकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव व ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे हे सदस्य आहेत. दुग्ध विभागाचे उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव असतीलदृष्टीक्षेपात गाय दूध उद्योगपश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत दोन-तीन जिल्हे वगळता सर्वत्र गाय दुधाचे उत्पादन. सध्या राज्यात प्रतिदिन २ कोटी ८० लाख लिटर उत्पादन.त्यातील १ कोटी १२ लाख लिटर बाजारात विक्रीसाठी. त्यातील ६० लाख लिटर खासगी दूध संघामार्फत, उर्वरित ४० लाख लिटर सहकारी दूध संघामार्फत, गवळी व्यावयायिकामार्फत १२ लाखांचे वितरण 

राज्य शासनाने समितीत सगळेच सरकारी अधिकारी नियुक्त केल्यामुळे शासनाला हवा तसाच ते अहवाल देणार आहेत. या समितीत दूध कृती समितीचे अध्यक्ष, सहकारी व खासगी दूध संघांचे प्रतिनिधींनीही स्थान हवे होते. दर वाढवून द्या म्हणणे म्हणजे चांगला चाललेला दूध धंदा मोडण्याचाच प्रकार आहे. विरोधकांनीही या प्रश्नांत राजकारण आणू नये.- अरुण नरके, अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन